Terrorists Targets Mumbai Local : राज्य सरकार, एटीएस झोपलं होतं का? : Ashish Shelar

Terrorists Targets Mumbai Local : दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या 6 दहशतवाद्यांसंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. मुंबई लोकल पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट रचला होता. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. असी धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच घातपाताचा कट यशस्वी करण्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाची ठिकाणंही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हा कट यशस्वी करण्यासाठी अनेक ठिकाणी विस्फोटकं पोहोचवण्यात आली आहेत, असं दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. 

यावर आता भाजपने सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार, एटीएस झोपलं होतं का? भाजपच्या आशिष शेलार यांचा सवाल; राज्यकर्त्यांनी पोलिसांना नको त्या कामात गुंतवल्यानं अश्या चुका होतात , आशिष शेलार यांचा सरकारवर आरोप

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola