Nashik Sharad Pawar: स्वतंत्रयवीर सावरकरांचं लिखाण अजरामर- शरद पवार ABP Majha

नाशिकमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला. सावरकरांचं स्वातंत्र्यलढ्यातील कार्य मोठं होतं. सावरकर यांचं लिखाण आजरामर आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही, असं पवार म्हणाले. कुसुमाग्रज यांचे कार्यही महान होते, मग वाद कशासाठी? असा सवाल त्यांनी केला. नाशिकच्या साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उचित गौरव झाला नसल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.या पार्श्वभूमीवर पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल भाष्य केलं..... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola