Sharad Pawar Book : पवारांच्या पुस्तकातील 'तो' मुद्दा, ठाकरे गटाची कोंडी; संजय राऊत म्हणतात...

Continues below advertisement

शरद पवारांचे आत्मचरित्र "लोक माझे सांगाती" मध्ये ठाकरे गटाची कोंडी करणारा आणखी एक मजकूर आहे. मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो, असं पवारांनी पान क्रमांक 417 वर लिहिलं आहे. यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची चांगलीच कोंडी झालीये. कारण मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप स्वतः ठाकरे आणि संजय राऊत सातत्यानं करत असतात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram