Mumbai Schools : मुंबईत शाळा सुरू, चिमुकल्यांचा पहिल्यांदाच शाळेत प्रवेश ABP Majha

ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावामुळे बंद झालेल्या राज्यातील शाळा सुरु करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. मात्र ठराविक शहरं सोडली तर जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु न करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतलाय. मुंबई, ठाणे, जळगाव, नाशिक, नंदुरबारमध्ये पहिली ते बारावीचे वर्ग भरणार आहेत. तर धुळ्यात नववी ते बारावी, बीडमध्ये अकरावी ते बारावी, जालन्यात आठवी ते बारावी, नांदेडमध्ये नववी ते बारावीचे असे टप्प्याटप्प्यानं वर्ग सुरू होतील. मुलांना शाळेत पाठवण्याची सक्तीन नसल्यानं पालकवर्ग काय भूमिका घेतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola