Coronavirus | शाळा, महविद्यालयांना सुट्टी द्या : इंडिया वाईड पॅरेंट असोसिएशनच्या अध्यक्षा अनुपा सहाय
कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानं मुलांच्या काळजीपोटी पालकांचीही चिंता वाढली आहे. कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी राज्यातल्या शाळा-महाविद्यालयांना तातडीने सुट्टी जाहीर करा, अशी मागणी पालक संघटनांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. कोरोना ज्या प्रकारे पसरत आहे त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हे पत्र पाठवून पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान मुंबईतल्या एका शाळेने वार्षिक परीक्षा न घेताच उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.