Mumbai Pollution : फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईतील प्रदूषण पातळी वाईट स्तरावर : ABP Majha

दिवाळीत नियमांना केराची टोपली दाखवल वाजवण्यात आलेल्या फटाक्यांच्या धुराने मुंबईला पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात ओढलं आहे. भाऊबिजेला मुंबईत ठिकठिकाणी हवेच्या गुणवत्तेची पातळी वाईट नोंदवण्यात आली आहे. लक्ष्मीपूजनाला मुंबईकरांना रात्री १२ वाजेपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी केली होती. त्यामुळे वायू प्रदूषणासह ध्वनी प्रदूषणानेही यात भर घातली होती. पाडव्याला फटाके वाजवण्याचे प्रमाण तुलनेने कमी असलं तरी भाऊबिजेला नोंदवण्यात आलेली हवा वाईट श्रेणीत आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola