Mumbai Water Scarcity : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 1 मार्चपासून 10 टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव
abp majha web team
Updated at:
15 Feb 2024 07:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईकरांना १ मार्चपासून १० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून केवळ ४८ टक्के पाणीसाठा उरल्यामुळे भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठा मिळावा अशी मागणी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. लोकसत्ता वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार बीएमसीने मुंबईत पाणीकपातीचा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळतेय..