Mumbai Traffic Update : मुंबईत पावसाची विश्रांती, पण वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांचा खोळंबा
Continues below advertisement
मुंबईत पावसानं विश्रांती घेतली आहे. पण अद्याप मुंबईत वाहतूक कोंडी मात्र कायम आहे. मुंबई आणि कोकणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात येत आहे. त्यात मुंबईकरांसाठी पुढचे तीन तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. कारण पुढच्या तीन तासांत मुंबईत अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईला गेल्या 4 तासांपासून पावसांन झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचण्यात सुरुवात झाली आहे. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांत मुसळधार पाऊस कोसळत आहे.
Continues below advertisement