Mumbai Rains : पावसाची काळरात्र! मुंबईत दरड, भिंत कोसळून तीन दुर्घटना, 19 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jul 2021 12:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई: मुंबईत कालची रात्र पावसामुळं काळरात्र ठरली आहे. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 19 जणांना मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये दरड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. इथं बचावकार्य अजूनही सुरु आहे. तर विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर भांडूपमध्येही भिंत कोसळून 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.