Mumbai Local | धक्कादायक! मुंबईकरांची लाईफलाईन ठरतेय डेथलाईन | ABP Majha

मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते, मात्र याच लाईफलाईनवर दरदिवशी ७ लोक मृत्युमुखी पडतात.
रेल्वे पोलिसांच्या आकडेवारीनुसार २०१९ मध्ये रेल्वे मार्गावर एकूण २ हजार ६९१ जणांचे मृत्यू झालाय तर ३ हजार १९४ प्रवासी जखमी झालेत. यातील सर्वाधिक बळी हे मध्य रेल्वेवर गेले आहेत. मध्य रेल्वेवरील अपघातात २०१९ या वर्षांत सर्वाधिक म्हणजे १, ७६३ प्रवाशांचा मृत्यू झाला.
धक्कादायक म्हणजे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक मृत्यू हे कल्याण आणि कुर्ला स्थानकात झाले. कल्याण स्थानकात ३३१ तर कुर्ला स्थानकात २०१९ मध्ये २९४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आलीय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola