Nawab Malik | जबरदस्तीनं नसबंदी करणार का? लोकसंख्या नियंत्रणाबद्दलच्या भागवतांच्या वक्तव्यावर नवाब मलिकांची टीका | ABP Majha

देशात आता 2 अपत्यांच्या कायद्याची गरज असल्याचं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय..पुढचा अजेंडा लोकसंख्या कायद्याचा असू शकतो असंही भागवत यांनी म्हटलंय..उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बैठकीत मोहन भागवत बोलत होते. दोन अपत्यांच्या कायद्यासंदर्भात देशभरात संघाकडून जनजागृती अभियान राबवलं जाणार आहे. दरम्यान नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत माघारी घेण्याची गरज नसल्याचंही सरसंघचालक मोहन भागवत म्हणालेत.. 
लोकसंख्या नियंत्रणाबद्दल मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्संख्यांक विकासमंत्री नवाब मलिकांनी काय म्हटलंय, पाहुयात...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola