Mumbai Rains : मुंबईत पाणी साचणार नाही असा दावा कुणीही केला नव्हता : महापौर किशोरी पेडणेकर
विरोधकांची होणारी टीका आणि पालिका प्रशासनाची तयारी याच मुद्द्यांवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं. 'सकाळी हायटाईडमुळे आणि पावसाच्या जोरामुळं शहरात काही तासांसाठी पाणी थांबलं होतं. पण, आता मात्र शहरात पावसाचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. आपण गेल्या वर्षापासून हेच सांगत आहोत की पाणी भरणार नाही असा दावा आम्ही केला नाही आणि करणारही नाही. पाणी भरल्यानंतर चार तासांच्या आत पाण्याचा निचरा नाही झाला तर मात्र पालिकेनं केलेलं काम हे बरोबर नाही हे म्हणायला वावगं नाही', असं महापौर म्हणाल्या.