Mumbai Mahayuti Candidate : महायुतीचे मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघरचे उमेदवार अर्ज भरणार

Continues below advertisement

पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महायुतीचे मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघरचे उमेदवार आज शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत. दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव, उत्तर-मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम, उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार रविंद्र वायकर, ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के, भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील, पालघरचे उमेदवार डॉ.हेमंत सावरा आज आपला अर्ज दाखल करतील. अर्ज दाखल करताना महायुती मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram