Retirement Age | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 चं ठेवावे; खटूआ समितीचा अहवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2020 08:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीची वयोमर्यादा 58 वर्षचं ठेवण्याची शिफारस खटूआ समितीच्या अहवालातून करण्यात आली आहे. राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 58 वरून 60 वर्षे करण्यास निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या बी. सी. खटुआ समितीचा अहवाल आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने याला विरोध केला आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यासंदर्भातील खटुआ समितीचा अहवाल कुचकामी व अनाकलनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.