SSR Suicide case | तिन्ही पक्षाच्या सरकारने पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला : राम कदम
मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचं काम या तिन्ही पक्षाच्या सरकारने केलं आहे. चोराच्या उलट्या बोंबा. स्वत: पोलिसांच्या कामात हस्तक्षेप करायचा. मुंबई पोलिसांची प्रतिमा ही शौर्याची आहे. त्यांना मोकळेपणाने काम करु द्यावं, त्यांच्या कामात हस्तक्षेप करु नये, अशीच आमची भूमिका होती. या तिन्हीच पक्षांनीच पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला, प्रत्यारोप भाजपचे नेते राम कदम यांनी केला.