Coronavirus | मुंबईत कोरोनाच्या चाचण्या नियंत्रित, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईत कोरोनाच्या चाचण्या नियंत्रित केल्या जात असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबईत कोरोना संसर्गाचं प्रमाण 28 टक्क्यांवर गेल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शहरात प्रत्येक 100 चाचण्यांपैकी 28 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं ते म्हणाले. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक पत्र लिहिलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola