Kanjurmarg Metro Car Shed | कांजूरच्या जागेमुळे सरकारचे साडेपाच हजार कोटी वाचणार : आदित्य ठाकरे
वैभव परब, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मेट्रोच्या चार महत्त्वाच्या कामांसाठी कांजूरची जागा महत्त्वाची आहे. कांजूरच्या जागेमुळे सरकारचे साडेपाच हजार कोटी वाचणार आहेत, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम तत्काळ थांबवण्याचे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयाच्या वतीनं हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार आहे. तसेच तूर्तास भूखंडाची स्थिती 'जैसे थे' ठेवण्याचे निर्देशही हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात यावर अंतिम सुनावणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.