तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर आल्याने लॉकडाऊनचा वापर? संदीप देशपांडेंचा सरकारला सवाल
मुंबई : राज्यात आणि देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी लॉकडाऊनची प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्रत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे कडक निर्बंध लावले जातायेत त्याला मनसेकडून विरोध केला जातोय. महाराष्ट्रला लागून असलेल्या गोवा, कर्नाटक आणि गुजरात या राज्यात कोरोना नाही, फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय ? असा प्रश्न मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी विचारालाय.