MNS Agitation I ठाण्यातील टोलमुक्तीसाठी मनसे पुन्हा एकदा आक्रमक I ABP Majha

ठाण्यातील टोलमुक्तीसाठी मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालीय. ठाणेकरांना टोलमधून सुटका मिळावी यासाठी आनंदनगर टोलनाक्यावर साखळी आंदोलन करण्यात आलंय. आनंदनगर टोल नाका ते कोपरी ब्रिजपर्यंत ही मानवी साखळी करण्यात आली होती. ठाणेकरांना टोल मुक्त करण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे. मात्र या टोलच्या मुद्द्यावरून मनसे आणि भाजपमध्ये मात्र संघर्षाची ठिणगी पडली आहे. 8 दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी एमएच 04 या वाहनांना टोलमुक्त केले असल्याचे जाहीर केले होते. तशा प्रकारच्या बातम्या देखील प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता यावरून मनसे-भाजपमध्ये संघर्षाची ठिणगी पडलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola