भिवंडीजवळ काटई गावात यंत्रमाग कारखाना कोसळला, ढिगाऱ्याखाली दबून तीन मजुरांचा मृत्यू, तीन जखमी
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभिवंडी : भिवंडीत धोकादायक यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे . या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू तर तीन मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. राजू उर्फ रणछोड प्रजापती ( वय 50 वर्ष ), भगवान मामा ( वय 55 वर्ष ), मनसुख भाई ( वय 45 वर्ष ) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांची नवे आहेत .
भिवंडी तालुक्यात काटई ग्राम पंचायत हद्दीत देवानंद कंपाउंड येथे हा धोकादायक यंत्रमाग कारखाना होता. कारखान्याच्या भिंती जीर्ण झाल्याने हा यंत्रमाग कारखाना मागील चार दिवसांपासून बंद होता. कारखान्याच्या जीर्ण झालेल्या भिंतींच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. गवंडी कामगार व मजुरांच्यामार्फत हे काम सुरु होते . यावेळी भिंतीचे काम करण्यासाठी मजुरांनी परांची देखील बांधली होती व त्यावर काम सुरु होते.