Migrant Workers : लॉकडाऊनच्या धास्तीने कामगारांनी धरली घरची वाट,गावी परतण्यासाठी परप्रांतीयांची लगबग
मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात टाळेबंदी केली जात असल्याने नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली तर राज्यात लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे भविष्य धुसर झाल्याने दुकाने, उपाहारगृहे, लहान कंपन्यांमधील कामगार, लघु व्यावसायिक, रोजंदारीवरील कामगार टाळेबंदीच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आता परत तेच दिवस नकोत, या भावनेने कामगारांनी घरची वाट धरली आहे.
Tags :
Mumbai Madhya Pradesh Uttar Pradesh Lockdown Migrant Workers Bihar Maharashtra Lockdown Migrants Migrants Return