Majha Maharashtra Majha Vision 2020 | कांजूर कारशेडची जागा ही राज्य सरकारचीच : एकनाथ शिंदे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'महाविकास आघाडी सरकारचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वांना अशक्य वाटणारी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि ताबडतोब त्याची अंबलबजावणीही केली. त्यानंतर आलेल्या चक्रीवादळातही सरकारने मदत जाहीर केलं. कोरोना काळात घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे कटुता आली, पण लोकांच्या आरोग्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ते निर्णय घेतले'; असं एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकाने केलेल्या कामांसंदर्भात बोलताना सांगितलं. ते एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात बोलत होते.
'कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याची आर्थिक घडीही विस्कटली आहे. एकंदरीत संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. पण आपल्या राज्यात ही घडी सावरण्यात आपल्याला यश मिळत आहे. कोरोना काळातही अनेक उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केली आहे.', असंही त्यांनी सांगितलं.
#MarathiNews #ABPMajha #ABPMajhaLiveNews