Mumbai local shut down | Coronavirus | मुंबई लोकल पूर्णपणे बंद, रेल्वेचा मोठा निर्णय
मुंबईतील लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 31 मार्चपर्यंत लोकल वाहतूक बंद राहणार आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर देशभरातील रेल्वेतील गर्दी लक्षात घेत रेल्वे मंत्रालयानेही रेल्वेसेवा मध्यरात्रीपासून बंद करण्याची घोषणा आहे. 31 मार्चपर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा रेल्वेचा निर्णय. सर्व मेल, एक्स्प्रेस, इंटरसिटी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारला विश्वासात घेत हा निर्णय घेतला असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. लोकल ट्रेन बंद झाल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी बसची सोय करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.