Mumbai Rain : मुंबईकरांसाठी चांगली बातमी, दोन दिवसांत 129 दिवसांचा पाणीसाठा वाढला
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
22 Jul 2021 11:21 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन दिवसांतल्या पावसानं मुंबईकरांसाठी चांगली बातमी दिलीय. दोन दिवसांच्या पावसामुळे मुंबईकरांचा १२९ दिवसांचा पाणीसाठा वाढला आहे. एका दिवसात ६५ दिवसांचा पाणीसाठा वाढला, तर काल रात्रीच्या पावसानं तानसा आणि मोडक सागरही भरलं. मुंबईला पाणीपुरवठा करणारी ७ पैकी ४ धरणं भरली आहेत.