Kalyan NIA : एनआयएनं कल्याणमधून आरीब माजिदलाही चौकशीला बोलावलं

Continues below advertisement

Kalyan NIA : एनआयएनं कल्याणमधून आरीब माजिदलाही चौकशीला बोलावलं महाराष्ट्रातल्या इसिस प्रकरणात एनआयएकडून उद्या वीसहून अधिक जणांची पुन्हा चौकशी होणार आहे. एनआयएनं गेल्या आठवड्यात ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पडघ्यानजिकचं बोरिवली गावात मिळून एकूण ४४ ठिकाणी धाडी टाकून १५ जणांना अटक केली होती. अटक झालेल्या आरोपींशी संबंधित त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या काहीजणांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यापैकी वीसजणांची एनआयएकडून उद्या पुन्हा चौकशी होणार आहे. पडघा परिसरातलं बोरिवली गाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. एनआयएनं चौकशीसाठी बोलावलेले बहुतेकजण याच बोरिवली गावातील आहेत. एनआयएनं कल्याणमधून अरिब माजिदलाही चौकशीसाठी बोलावलं आहे. अरिब माजिद  हा २०१४ साली इसिसमध्ये सामील होण्यासाठी इराकला गेला होता. तो इराकमधून परतल्यानंतर त्याला अटक झाली होती. पण नंतर त्याची जामिनावर सुटका झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram