Maharashtra :बुलढाण्यात रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा मिळणं कठीण,बळीराजासमोर नवं संकट
बुलढाण्यात रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा मिळणं कठीण झालंय.. तर ऐन थंडीत पिकं बहरत असताना बळीराजासमोर नवं संकट उभं राहिलंय. अनेक ठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने एक एकर शेतीला पाणी देण्यासाठी तब्बल आठ दिवस लागत आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसात रात्रभर जागून शेतकऱयांना सिंचन करावं लागतं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.