Hit and Run | पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांचा मृत्यू; आरोपीला न्यायालयाकडून जामीन
नवी मुंबईत हिट अँड रन प्रकरणी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. आरोपीला अटक करण्याऐवजी पोलिसांनीच आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप मयत मुलांच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळं पोटच्या मुलाच्या मरणापेक्षा आपल्याच पोलीस यंत्रणेने दिलेल्या वेदना जास्त मन हेलावणाऱ्या असल्याची भावना मयत मुलांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.