माथ्यावर लॉकडाऊनचं संकट त्यात पावसाचा फटका, गिरगाव परिसरात काल 5 ते 6 फूट पाणी, कोट्यवधींचं नुकसान

मुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरुच आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. कोकणातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे काही सखल भागात पाणी साचलं आहे. तर पालघरमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक बंद झाली आहे. गिरगाव परिसरात यापूर्वी कधीही पाणी साचलं नव्हतं, मात्र अचानक पाच ते सहा फूट पाणी साचलं आणि दुकानांमध्ये शिरून नासाडी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola