Mumbai : पावसामुळे पीकांचे नुकसान, भाज्यांचे आवक घटल्याने भाव कडाडले

Continues below advertisement

Mumbai : पावसामुळे पीकांचे नुकसान, भाज्यांचे आवक घटल्याने भाव कडाडले आठवड्यापूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होताना बघायला मिळाले होते. काढणीला आलेल्या भाज्या पूर्णपणे खराब झाल्या. त्यामुळे भाज्यांचे दर देखील कडाडले आहेत. भाज्यांची आवक २५ ते ३० टक्क्यांनी घटल्याचं चित्र आहे. परिणामी, भाजीपालाच्या दरात २० ते २५ टक्क्यांची वाढ बघायला मिळते आहे. बाजारात भाजीपाल्यांची आवक सुरळीत व्हायला साधारण एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत सर्वसामान्यांना भाजीपाला चढ्या दराने घ्यावा लागणार आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram