Barge P-305 वरील शोध आणि बचावकार्य सुरुच, 2 जणांना वाचवलं, 11 जणांचा शोध सुरु
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : तोक्ते चक्रीवादळामुळे आतापर्यंत मोठं नुकसान झाले आहे. अनेक राज्यांत या चक्रीवादळामुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. अरबी समुद्रात बार्ज पी 305 जहाज बुडताना कर्मचाऱ्यांनी पाण्यात उड्या घेतल्या. यातील 125 जणांना घेऊन नौदलाची युद्धनौका आयएनएस कोची मुंबईला पोहोचली. सोबतच 26 मृतदेहही ताब्यात घेण्यात आले आहेत. बार्जवर एकूण 273 लोक उपस्थित होते, त्यापैकी नौदलाने आतापर्यंत 188 लोकांना वाचवले आहे.
डिफेन्स पीआरओ (मुंबई) च्या माध्यमातून ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये आयएनएस कोची आज सकाळी शहरातील बंदरात प्रवास करताना दिसत आहेत, ज्यात पी 305 बार्जवरील 188 लोकांना वाचविण्यात आले. आयएनएस कोलकाताही इतरांना वाचवून आज मुंबई बंदरात परतले आहे.
नौदलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई किनाऱ्यावरील अरबी समुद्रात तोक्ते चक्रीवादळामुळे बुडालेले बोर्ड हाऊसिंग बार्ज पी 305 वर कमीतकमी 26 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 65 जण बेपत्ता आहेत. प्रतिकुल हवामानाचा सामना करणाऱ्या नौदलाच्या जवानांनी आतापर्यंत पी 305 जहाजात बसलेल्या 273 पैकी 188 लोकांची सुटका केली आहे.