स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाचं ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजन, मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मुंबई : आज 'आजादी का अमृत महोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन मुंबईत करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाचा नुसता उत्सव नाही. तर हा जात, पात, धर्म या पलीकडे जाऊन देशा प्रति आपल्या सगळ्यांच्या भावनांचा सन्मान आहे.  75 वर्ष पूर्ण करतो आहोत. कुर्बानीची पण आठवण ठेवत आहोत.  जे शहीद झाले त्यांची आठवण काढतो पण तितकंच मर्यादित नाही.  त्यांनी बलिदान केलं आहे. त्यांना अभिमान वाटेल अस जगणं असा देश उभा करू शकलो का हा प्रश्न आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola