Borivali To Thaneदीड तासाचा प्रवास वीस मिनिटांत पार होणार, भुयारी मार्ग प्रकल्पांसाठी निविदा काढणार
बोरिवली- ठाणे हा दीड तासाचा प्रवास १५ ते २० मिनिटांवर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भुयारी मार्ग प्रकल्पाची प्रतीक्षा संपणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाऱ्या या भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामासाठी पुढील दोन महिन्यांत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून निविदा काढल्या जाणार आहेत. त्यासाठी सुमारे सात हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा भारतातील सर्वांत मोठा भुयारी मार्ग ठरणार आहे.