Maharashtra Government Formation | फोडाफोडी न करता भाजपला सरकार बनलवणं शक्य? | ABP Majha
महाराष्ट्रात भाजपशिवाय सरकार स्थापन होऊच शकत नाही, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. मुंबईत भाजप कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजपशिवाय कुठल्याही पक्षाला 100च्या पूढे जागा मिळालेल्या नाहीत. अपक्षांसह भाजपकडे 119 आमदार आहेत. आमची कुणाशिही चर्चा सुरु नाही, पण आमच्याशिवाय राज्यात स्थिर सरकार येऊ शकत नाही, असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलाय.