Mumbai : …तर खासदारकीचाही राजीनामा देणार : BJP MP Gopal Shetty : ABP Majha
मुंबईतील झोपडपट्टीवासियांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी सर्व समित्यांवरील राजीनामा दिला आहे. जोपर्यंत झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर मिळत नाहीत तोपर्यंत मी आक्रमक भूमिका घेणार असल्याचं शेट्टी म्हणाले. तसेच गरज पडल्यास खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं गोपाळ शेट्टी म्हणाले. या संदर्भात त्यांची नेमकी काय भूमिका जाणून घेतली आमचे प्रतिनिधी नवनाथ बन यांनी