Kirit Somaiya PC | ठाकरेंनी 5 पैकी एका प्रश्नाचं उत्तर द्यावं; किरीट सोमय्या यांचं आव्हान

Continues below advertisement
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचे 21 व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. त्यवरून आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी दिलेल्या वॉर्निंगलाही त्यांनी उत्तर दिलं आहे. तसेच शिवसेनेत हिंमत असेल तर त्यांनी मला हात लावून दाखवावं, असंही ते म्हणाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram