Bacchu Kadu - Ravi Rana : रवी राणा - बच्चू कडू वाद मिटल्याची घोषणा होणार?

Mumbai : आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu)यांच्यातील वादावर कोणताही तोडगा निघाला नसल्याची माहिती मिळतेय.. या दोन्ही नेत्यांमधील वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde)यांनी वर्षावर बोलावलं होतं.... वर्षावर काल रात्री तब्बल अडीच तास बैठक झाली... मात्र बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती मिळतेय.. राणा आणि कडू आज सकाळी ९ वाजता उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेणार आहेत.. या भेटीनंतर पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.. त्यामुळे राणा-कडू वाद मिटणार की चिघळणार याकडं लक्ष लागलंय... बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले असा आरोप राणा यांनी केला आणि कडू यांनी त्यांना पुरावे देण्याचं आव्हान दिलं. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु होत्या. बच्चू कडू यांनी राणांना १ नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय... अखेर अमरावतीच्या दोन्ही आमदारांमधल्या संघर्षात अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केलाय....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola