Mumbai : MNS Beach cleaning : प्रशासनाची इच्छाशक्ती असती तर ही वेळ आली नसती : Amit Thackeray
राज्यभर मनसेनं सागरी किनारे स्वच्छता मोहीम हाती घेतलीय. मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या ७२० किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्यावर ही मोहीम राबवण्यात येणार आहे. शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दादर चौपाटीवर या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या अभियानात किनारपट्टीवरील ४० हून अधिक किनाऱ्यांची सफाई करण्याचा मनसेचा संकल्प आहे. अमित ठाकरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दीपेश त्रिपाठी यांनी......