Aditya Thackeray on Eknath Shinde : शिंदेंच्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी सरकारकडून दबाव
मुंबईतील रस्त्यांची आणि उड्डाणपुलांची कामे गेल्या दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ बंद आहेत. नियमित पुरवठादारांकडून खडी पुरवठ्याच्या अभावामुळं ही काम बंद असल्याचं सांगून आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका प्रशासनाला सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांचा खडी पुरवठ्याच्या कंत्राटामध्ये हस्तक्षेप असल्याचा आणि मुख्यमंत्र्यांच्या कंत्राटदारालाच कंत्राट द्यावं असा दबाव शिंदे सरकारकडून येत असल्याचा आरोप आदित्य यांनी केला आहे. एप्रिल संपत आला तरी कामं सुरू झालेली नाहीत, पावसाळा सुरू होण्याआधी ही कामं पूर्ण होणार नाहीत असंही ते म्हणाले