Aaditya Thackeray on Politics : राज्यात घाणेरडं राजकारण सुरुये, लोकांना पटणार नाही : आदित्य ठाकरे
आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षेपोटी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न होत आहे. वार करायचे असतील तर समोरुन या, असं आव्हान आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिली मुलाखत एबीपी माझाला दिली. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.