Aaditya Thackeray : मोदींच्या दौऱ्याआधी श्रेयवादाची लढाई, आदित्य ठाकरेंचं इक्बालसिंह चहल यांना पत्र

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी मुंबईत श्रेयवादाची लढाई रंगली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र लिहून महाविकास आघाडी सरकारच्या काळात गती देण्यात आलेल्या दोन प्रकल्पांची आठवण करून दिली आहे. मविआ सरकारच्या काळात एसटीपी आणि खारं पाणी गोड करणं या दोन प्रकल्पांना गती देण्यात आल्याची आठवण आदित्य ठाकरेंनी चहल यांना करून दिलीय. पंतप्रधान मोदी हे १९ जानेवारीला मुंबई महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पांसह विविध विकासकामांचं उद्धाटन करणार आहेत. या प्रकल्पांची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही अद्याप भूमिपूजन का नाही? तसंच सहा महिन्यांचा कालावधी वाया कशासाठी घालवला, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram