Admission | अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची 'परीक्षा', 70 हजार विद्यार्थी कॉलेजच्या प्रतिक्षेत
वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
18 Sep 2021 09:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन तीन फेरी पूर्ण होऊन सुद्धा अजूनही मुंबई विभागात साधारपणे 70 हजार विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले नसून अजूनही कॉलेजच्या प्रतीक्षेत आहेत. पसंतीच्या कॉलेजसाठी धरलेला आग्रह, तांत्रिक अडचणी अशा कारणांमुळे विद्यार्थी अजूनही कॉलेज मिळावं यासाठी विशेष फेरीची वाट पाहताय. जेणेकरून आपल्या पसंतीचा कॉलेज या फेरीत तरी मिळेल. मात्र, खरंच नामांकित कॉलेजला या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीनंतर प्रवेश मिळणार का? या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश घेताना या विशेष फेरीकडे कसा पाहायला हवं? पाहूया त्या संदर्भतला हा रिपोर्ट.