KDMC Villages | कल्याण डोंबिवली मनपातून वगळलेल्या 27 पैकी 18 गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन होणार
कल्याण डोंबिवली मनपातून वगळलेल्या 27 गावांना राज्य सरकारने मोठा दिलासा आहे. या 27 पैकी 18 गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन होणार आहे. कल्याण उपनगर नावाने ही नगरपरिषद अस्तित्वात येईल. तर उर्वरित 9 गावांचा कल्याण-डोंबिवली महापालिकेत समावेश असेल. नगरविकास विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.