उमेद अभियानाअंतर्गत काम करणाऱ्या महिलांचं आंदोलन, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केलं जात असल्याचा आरोप

Continues below advertisement

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमेद या अभियानाच्या अंतर्गत काम करणाऱ्या महिलांकडून विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततेत आज मूक मोर्चा काढला गेला. शासनाने काढलेला 10 सप्टेंबरचा अध्यादेश रद्द करा,उमेदचे खाजगीकरण थांबवा, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या  संपलेल्या नियुक्त्या वाढवा, सर्व कर्मचाऱ्यांना वयाच्या 58 वर्षापर्यत सेवा द्या. या विविध मागण्यांसाठी उमेदच्या महिलांनी उस्मानाबादमध्ये आज मूक मोर्चा काढला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram