India VS China border dispute | चीनच्या कटाला भारतीय जवानांनी चोख उत्तर दिलं, लोकसभेत राजनाथ सिहांचं वक्तव्य
देशाचं सुरक्षा दल कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात 15 जून रोजी चीनच्या सैनिकांनी स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, त्यांचा हा प्रयत्न आपल्या सैनिकांनी उधळून लावला. यामध्ये आपले अनेक सैनिक शहीद झाले. त्याचवेळी चीनचंही मोठं नुकसान झालं. दोन्ही देशांनी एलएसीचा आदर केला पाहिजे, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.
Tags :
China Attack India Vs China Galwan Valley Indian Soldier Rajnath Singh India China India China War India China Border