ZP Mahabharati : जिल्हा परिषदची महाभरती रद्द, संपूर्ण फी परत केली जात नसल्याची तक्रार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZP Mahabharati : जिल्हा परिषदची महाभरती रद्द, संपूर्ण फी परत केली जात नसल्याची तक्रार
राज्य शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेसाठी 13000 पदाच्या भरती प्रक्रियेचे अर्ज 2019 मध्ये मागवण्यात आले होते त्यासाठी एका खाजगी कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती सुमारे 12 लाख बेरोजगारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केले सुमारे 33 कोटी रुपये हे या परीक्षार्थी कडून वसूल करण्यात आले परंतु या बोगस कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर या कंपनीकडून सुमारे १० कोटी रूपये सरकारला परत मिळालेले नाहीत. परीक्षार्थी अनेक वेळा मागणी केल्यानंतर आमचे पैसे परत द्या या मागणीनंतर काल सरकारने अंतर्गत जिल्हा परिषदांनाजिल्हा परिषदेंना तुम्ही परीक्षा अर्थांचे पैसे परत द्या असे आदेश दिले परंतु बारा लाख परिक्षार्थ्यांची केवळ 65 टक्केच रक्कम विद्यार्थ्यांना परत दिली जाणार आहे. पस्तीस टक्के गायब झालेल्या रकमेबद्दल सरकारच्या अंतर्गत असलेल्या कम्युनिकेशन मध्ये काहीही माहिती देण्यात आलेली नाही.