Zero Hour : ओबीसीच्या प्रश्नांवर सरकारची खलबतं, तोडगा कामी येणार की नाही ?
Continues below advertisement
एकीकडे मुंबईत हायव्होल्टेज बैठक सुरु होती.. तर दुसरीकडे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ओबीसी आंदोलनं सुरु होती.. परभणी, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना, नांदेड, पंढरपूर अशा अनेक शहरांमध्ये आंदोलनं सुरु होती.. कुठे रास्ता रोको होता.. कुठे निदर्शनं होती.. कुठे मोर्चा होता.. तर कुठे आमरण उपोषण सुरु होतं.. तर काही ठिकाणी टायर जाळत घोषणाबाजीही झाली.. त्यामुळे राज्यात सामाजिक तणावाची भीती निर्माण झालीय.. म्हणून मुंबईतल्या बैठकीला विशेष महत्व येतं.. आणि त्यावरच होता आपला पहिला प्रश्न.. तोच पाहण्यासाठी जावूयात पोल सेंटरला..
Continues below advertisement