Zero Hour Full : ठाकरेंनी सुरु केलेल्या मराठी-हिंदी भाषा वादातून हिंदूंच्या विभाजनाचा प्रयत्न?

Continues below advertisement

Zero Hour Full : ठाकरेंनी सुरु केलेल्या मराठी-हिंदी भाषा वादातून हिंदूंच्या विभाजनाचा प्रयत्न?

ठाकरे बंधूंचा विजय मेळावा उद्या वरळी डोममध्ये पार पडणार आहे. सध्या या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे. 8 हजार क्षमतेचा हा डोम सजवला जात असून, व्हीआयपी रांगांचीही आखणी केली जात आहे. मराठी भाषेचे फलक परिसरात लावण्यात आले आहेत. या मेळाव्यासाठीची स्टेज संपूर्णपणे भगव्या रंगात सजवली जात असून, झेंडूच्या फुलांनी स्टेजला खास आकर्षक स्वरूप देण्यात येत आहे. उद्या नेमकं ठाकरे बंधू काय बोलतात, युतीबाबत काही संकेत देतात का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. 

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एक पत्रक काढत सर्वांना आव्हान केलं आहे. आवाज मराठीचा...असं म्हणत मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं..., कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं...आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या...आम्ही वाट बघतोय..., असं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola