Zero Hour : पुणे शहर कुणामुळे पाण्यात? अजित पवारांचं चुकीच्या पद्धतीने झालेल्या बांधकामांवर बोट!
Zero Hour Guest Center : पुणे शहर कोणामुळे पाण्यात गेलं? मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
गेल्या काही वर्षानंतर असा पाऊस झाला. धरण क्षेत्रात पाऊस झाला आणि विसर्ग केला तर आजवर अशी परिस्थिती उद्भवत होते. 40 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाला तर अशी पूरस्थिती व्हायची. पण आज पहाटे अगदी 55 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करावा लागला अन पुण्यात हाहाकार झाला. त्यामुळं मी अधिवेशन सोडून आलो. माझी ही जबाबदारी आहे. सकाळ पासून मी आढावा घेतलाय, उद्या परत मी जिल्हाधिकारी आणि पालिलेकडून पुन्हा माहिती घेतली जाईल. - जलसंपदा आणि पालिकेतील अभावामुळे आजची ही परिस्थिती उद्भवली, याची चौकशी करून कारवाई करणार. पण आधी पूरस्थिती हाताळणार मग कारवाई करणार.