Maharashtra Winter : रब्बी पिकांसाठी थंडी फायदेशीर, थंडीपासून बचावासाठी शेकोट्याचा आधार : ABP Majha


धुळ्यात सलग तिसऱ्या दिवशी तापमानाचा पारा घसरतोय. आज तर धुळ्याचं तापमान 5.6 अंशांवर आलंय. त्यामुळे वातावरणातील गारठा वाढलाय. हाडं गोठवणारी थंडी असल्यानं धुळेकरांनी घरात राहण्यालाच पसंती दिलीय. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळही कमी झालीय. तर तिकडे परभणी जिल्ह्यात तापमान 8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालीय. मागच्या 6 दिवसांपासून जिल्ह्यात कडाक्याची थंडी आहे. थंडीपासून बचावासाठी सामान्यांना विविध उपाय करावे लागताहेत. दुसरीकडे रब्बी पिकांना मात्र याचा फायदाच होतोेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola