Amravati Violence : महाराष्ट्रात उसळलेल्या दंगलींच पाप कोणाच्या माथी? ABP Majha

Continues below advertisement

Maharashtra Tripura violence : त्रिपुरात एका समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराविरोधात महाराष्ट्रात दोन दिवसांपासून आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. अमरावती, नांदेडसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडत आहेत. यामध्ये अनेकजण जखमीही झाले आहेत. या घटनेनंतर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. राज्यातील सरकारचं हे अपयश असल्याचं म्हणत विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय. तर राज्यात दंगली घडवून सरकार अस्थिर करण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीनं केलाय. पण महाराष्ट्रात उसळलेल्या दंगलींच पाप कोणाचं ? 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram